Tuesday, August 12, 2025
HomeUncategorizedAir India : १०० प्रवाशांचा थोडक्यात वाचला जीव ! एअर इंडियाचं विमान...

Air India : १०० प्रवाशांचा थोडक्यात वाचला जीव ! एअर इंडियाचं विमान तांत्रिक बिघाडामुळे उतरवलं

अकोला दिव्य न्यूज : Air India : एअर इंडियाच्या AI2455 या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आणि खराब हवामानामुळे हे विमान चेन्नईमध्ये उतरवण्यात आलं. या विमानात खासदार केसी वेणुगोपाल, अडूर प्रकाश, के राधाकृष्णन, रॉबर्ट ब्रुस हे सगळे दिल्लीला जात होते. पण हे विमान तांत्रिक बिघाडामुळे चेन्नईत उतरवण्यात आलं. खासदार वेणुगोपाल यांनी या घटनेबाबत माहिती दिली.

केसी वेणुगोपाल काय म्हणाले?
आम्ही ज्या विमानात बसलो होतो त्यात प्रचंड प्रमाणात टर्बुलन्सचा सामना करावा लागला. त्यानंतर एक तासाने वैमानिकाने विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घोषणा केली व विमान चेन्नईत उतरवलं. पहिल्यांदा लँडिंग करत असताना एक धक्कादायक प्रसंग आला होता. कारण समोर आलेल्या माहितीनुसार तिथेच एक दुसरं विमान उपस्थित होतं. त्यामुळे वैमानिकाने तातडीने आमचं विमान लँड होतानाच पुन्हा आकाशाच्या दिशेने फिरवलं. त्यामुळे सगळ्या प्रवाशांचा जीव वाचला. तर दुसऱ्यांदा त्याने व्यवस्थित लँडिंग केलं.

आमचं नशीब चांगलं होतं म्हणून आम्ही…
आमचं नशीब बलवत्तर होतं आणि पायलटने प्रसंगावधान दाखवलं त्यामुळे आमचा जीव वाचला. पण प्रवाशांच्या बाबतीत अशी घटना घडायला नको. मी डीजीडीसीएला आवाहन करतो की या घटनेची तातडीने चौकशी करा. अशा प्रकारची घटना पुन्हा होता कामा नये यासाठी काळजी घ्या असंही वेणुगोपाल म्हणाले.

एअर इंडियाने खोडला वेणुगोपाल यांचा दावा
दरम्यान एअर इंडियाने केसी वेणुगोपाल यांचा दावा खोडून काढला आहे. धावपट्टीवर आधी कुठलंही विमान नव्हतं. तांत्रिक बिघाडामुळे विमान लँड करत आहोत असं पायलटने सांगितलं होतं. वैमानिकाने सावधगिरी बाळगत विमान उतरवलं असं एअर इंडियाने म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. एअर इंडियाने असंही म्हटलं आहे की आमचे वैमानिक अशा प्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठी अत्यंत कुशलपणे कार्यरत आहेत. या उड्डाणाच्या वेळीही वैमानिकाने सावधगिरी बाळगून आणि प्रसंगावधान दाखवत विमान उतरवलं. विमान अचानक उतरवण्यात आल्याने प्रवाशांना जो त्रास झाला त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत असंही एअर इंडियाने म्हटलं आहे.

लँडिंग बाबत एअर इंडियाने काय म्हटलं आहे?
एअर इंडियाने जे पत्रक या घटनेबाबत काढलं आहे त्यात कुठलंही विमान आधीपासून रनवेवर होतं असा उल्लेख करण्यात आलेला नाही. विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. खराब हवामानामुळे ते उतरवता आलं नाही. १० ऑगस्टला तिरुवनंतपुरम या ठिकाणाहून या विमानाने दिल्लीला उड्डाण केलं होतं. पण तां

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!