Saturday, May 18, 2024
Home संपादकिय अकोल्यात मतदानाचा टक्का घसरणार ? ज्येष्ठांचा रोष व सामान्यातील निरुत्साहाने मोठे आव्हान...

अकोल्यात मतदानाचा टक्का घसरणार ? ज्येष्ठांचा रोष व सामान्यातील निरुत्साहाने मोठे आव्हान उभे ठाकले

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी झालेल्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात १९ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशांतील १०२ मतदारसंघांत १६ कोटींहून अधिक मतदार असतानाही ६५.५० टक्के मतदान झाले. तर २०१९ मध्ये पहिल्या टप्प्यात ६९.५० टक्के मतदान झाले होते. यंदा निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध प्रयत्न केले असले तरी मतदानाची टक्केवारी वाढविण्यात अपयश आले. निवडणूक आयोगाच्या ‘व्होटर टर्नआऊट’ अ‍ॅपमध्ये शनिवारी संध्याकाळी ७ वाजता मतदानांची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली. देशातील १०२ मतदारसंघांपैकी केवळ १० मतदारसंघांमध्येच अधिक मतदान झाले. पहिल्या टप्प्यात २०१९ पेक्षा चार टक्क्यांनी मतदान घटले, याचा अर्थ गेल्या वेळेच्या तुलनेत यंदा ४८ लाख नोंदणीकृत मतदार मतदानासाठी आले नाहीत.

लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या पहिला टप्प्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत मतदारांच्या उत्साहाबाबतचा स्पष्ट अंदाज येतो. गेल्या दोन लोकसभा निवडणुकाही एप्रिल व मे महिन्यात झालेल्या असतानाही पहिल्या टप्प्यात अधिक मतदान झाले. २०१९ मध्ये सात टप्प्यांपैकी सर्वाधिक मतदान पहिल्या टप्प्यात ६९.५ टक्के झाले होते. तसेच २०१४ मध्येही नऊ टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यात सर्वाधिक ६९ टक्के मतदान झाले होते. मागील २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीच्या प्रमाणात यंदा पहिल्या टप्प्यातच कमी मतदान झाल्याने निवडणूक आयोगासह निवडणूक रिंगणात असलेल्या प्रमुख उमेदवारांसमोर मतदान वाढविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

पहिल्य टप्प्यात देशातील १९ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशांतील मतदारसंघ मिळून १०२ मतदारसंघांत २०१९ पेक्षा चार टक्क्यांनी मतदान घटले, यात पुर्व विदर्भातील ५ लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.पुर्व विदर्भातील या 5 मतदारसंघात २०१९ पेक्षा यंदा सरासरी १० टक्के मतदान कमी झाले आहे. मतदानाच्या कमी झालेल्या टक्केवारीच्या पार्श्वभूमीवर येत्या शुक्रवार दि. २६ एप्रिलला पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम-यवतमाळ आणि वर्धा या ५ मतदारसंघात मतदान होणार असून उमेदवारांच्या मनात धडकी भरली आहे. दरम्यान पुर्व विदर्भातील विविध शहर व गावातील नातलग, ओळखीचे अधिकारी, मित्र आणि राजकीय पक्षातील जबाबदार लोकांशी संवाद साधला असता, मतदानात घट का झाली याची विविध कारणे देण्यात आली.

उष्णतेत वाढ, लग्नसराई आणि मतदानासाठी उत्साहाचा अभाव अशी कारणे देण्यात आली. ही कारणे रास्त असली तरी गत निवडणुका एप्रिल व मे महिन्यात झालेल्या असताना पश्चिम विदर्भातील तापमान ४२ ते ४६ अंश सेल्सिअस एवढे वाढलेले होते. सोबतच लग्नाचीही धामधूम होतीच, हे लक्षात घेतले तर मतदानासाठी उत्साहाचा अभाव, हेच प्रमुख कारण आहे. असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. यंदही तापमान २०१९ एवढेच असून २६ तारखेला दाट लग्न तिथी आणि पुन्हा ३ दिवसांची सलग सुट्टी आहेच. मौजाच मौजा ! म्हणजे नोकरीपेक्षा मतदार मतदानाला पाठ दाखवून आपल्या कुटुंबासह सहलीवर जाणार, यात दुमत नाही. अकोला मतदारसंघात नांव असलेले किमान २० हजारांच्यावर तरुण मतदार मुंबई पुणे, बंगलुरूह परराज्यात वास्तव्यास असून, त्यांना मतदानात रस नाही. हे एक कटू सत्य आहे.अकोला शहरातील अनेक जेष्ठांशी चर्चा केली असताना, रेल्वे प्रवासातील भाडे सुविधा बंद केल्याबाबत रोष व्यक्त केला. सर्व सामान्य मतदारांचा एक ना अनेक बाबतीत भ्रमनिरास झाल्याची बाब चर्चेतून अधोरेखित होते. विविध कारणांमुळे निवडणूक आयोगासमोर मतदान वाढविण्याचे महत्त्वपूर्ण आव्हान उभे ठाकलेआहे, असे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. पहिल्या टप्प्यातील झटक्याने दुसऱ्या टप्प्यांमध्ये मतदारांना मतदानास प्रोत्साहित करण्यासाठी निवडणूक विभागाला विविध मार्ग शोधावे लागतील, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. पण एकंदरीत मतदारांचा कौल/कल/विचार बदलणार, अशी शक्यता सध्यातरी कमीच आहे.

प्रश्न अनेक आहेत, काही सुटणार, काही राहणार आहेत. पण मतदानाकडे पाठ केल्याने समस्या वाढणार, हे सुज्ञानी लक्षात घेऊन मतदान करणे आवश्यक आहे. तेव्हा आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी मतदान कराच, असे आवाहन अकोला दिव्य परिवार करीत आहे. तुर्तास एवढेच!

मतदान जागृतीसाठी विविध संकल्पना

* मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने विविध समाजमाध्यमांचा वापर केला.

* टर्निग १८’ आणि ‘यू आर द वन’ यांसारखे अनोखे अभियान राबविले.

* आयोगाकडून ‘चुनाव का पर्व, देश का गर्व’ या संकल्पनेच्या अंतर्गत अनुरूप संदेश धोरणाचा वापर सुरू केला.

* फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स, यू टय़ूब यांच्यासह सर्व मुख्य समाज माध्यम मंचावर निवडणूक आयोग सध्या सक्रीय असून सार्वजनिक अ‍ॅप, व्हॉट्सअप आणि लिंक्ड इन यांचाही वापर सुरू केला.

* विविध क्षेत्रांतील मान्यवरांची सदिच्छादूत म्हणून निवड केली.* आयपीएल सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘बीसीसीआय’सह प्रयत्न केले. विविध भित्तीचित्रे, शालेय शिक्षक, पत्रके यांद्वारे जनजागृती.

RELATED ARTICLES

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

खरं काय अन् खोटं का ? मुस्लिम लोकसंख्येला राजकीय गंध ! ‘या’ दोन गोष्टींचा बागुलबुवा केला की…

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : ग्रामपंचायतीपासून तर लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या प्रचार काळात प्रतिस्पर्ध्यांवर वार-पलटवार करणे, उणे दुणे काढून एकमेकांना टोले...

भाजप बहुमतपासून दूर ? मोदींचा टप्प्यागणिक भरकटलेला प्रचार आणि चार टप्प्यासाठी केजरीवालही मैदानात

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : लोकसभेची निवडणूक आता उत्तरेकडे सरकू लागली असून टप्प्यागणिक भाजपच्या प्रचाराची दिशा बदलत आहे. प्रचाराच्या शुभारंभाचा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

Recent Comments

error: Content is protected !!