Saturday, May 18, 2024
Home ताज्या घडामोडी सुप्रीम कोर्टाचा ईडीला खडा सवाल ! केजरीवालांना निवडणुकीपूर्वी अटक का करण्यात आली?

सुप्रीम कोर्टाचा ईडीला खडा सवाल ! केजरीवालांना निवडणुकीपूर्वी अटक का करण्यात आली?

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत. मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. यानंतर अरविंद केजरीवाल यांच्यावतीने ईडीने केलेली कारवाई ही बेकायदेशीर असल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ईडीला प्रश्न विचारत लोकसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांना अटक का करण्यात आली? असा सवाल केला. या प्रश्नावर न्यायालयाने ईडीकडून सविस्तर उत्तर मागवलं आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.केजरीवाल यांना जाणीवपूर्वक लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी अटक करण्यात आल्याचा आरोप न्यायालयात करण्यात आला. यावर न्यायालयाने ईडीच्या वकिलांना याबाबत प्रश्न विचारला. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री केजरीवाल यांना का अटक करण्यात आली? स्वातंत्र्य महत्त्वाचे असून आपण ते नाकारु शकत नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

न्यायालयाने कोणते प्रश्न विचारले?
लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक का?, मद्य धोरण घोटाळा प्रकरणात केजरीवाल यांचा सहभाग कसा याबाबत सांगा?, कारवाई सुरु झाली आणि अटक झाली यामध्ये एवढे अंतर कसे?, यासह आदी प्रश्न सुनावणीवेळी न्यायालयाने ईडीला केले. या प्रश्नासंदर्भात ३ मे पर्यंत सविस्तर उत्तर द्या, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. आता पुढच्या सुनावणीवेळी यासंदर्भात ईडीकडून उत्तर सादर केले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणात केजरीवाल सरकारवर दक्षिण भारतातील व्यापाऱ्यांकडून कोटयवधी रुपये उकळण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच गोवा निवडणुकीत वापरण्यात आलेले ४५ कोटी या गैरव्यवहाराशी संबंधित आहेत. केजरीवाल या प्रकरणात त्यांच्या सहकाऱ्यांच्या कृतीसाठी ते जबाबदार आहेत, असे आरोप त्यांच्यावर आहेत.

RELATED ARTICLES

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

पंतप्रधान मोदी म्हणतात,आमच्या घरीही ईद साजरी व्हायची ! माझ्या घरी सर्व मुस्लिम कुटुंबातून जेवण यायचे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : माझ्या घराभोवती सर्व मुस्लिम कुटुंबे होती. आमच्या घरीही ईद साजरी व्हायची. इतर सणही साजरे केले जायचे. ईदच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

Recent Comments

error: Content is protected !!