Saturday, May 18, 2024
Home महाराष्ट्र भारत कृषक समाज : शेतकऱ्यांचा बळी देण्याचा अधिकार शासनाला कोणी दिला

भारत कृषक समाज : शेतकऱ्यांचा बळी देण्याचा अधिकार शासनाला कोणी दिला

अकोला दिव्य न्युज ब्युरो : दरवेळेस महागाईची झळ जनतेला बसु नये. यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे नेहमीच वेगवेगळे धोरणात्मक निर्णय घेवून महागाईला आळा घालण्याचे काम चालू आहे.पण शासनाच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांना थेट नुकसान सहन करावे लागत आहे. कृषी उत्पादनासाठीचे बी-बियाणे, शेती मशागत, किटकनाशके, मजुरी, काढणी इत्यादींचा खर्च भरमसाठ वाढला आहे. त्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना नेहमीच आर्थिक फटका सहन करावा लागतो.

पिक विम्याच्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना पाहिजे तसा फायदा होत नाही. त्यामुळे त्यांचे नुकसानही भरून निघू शकत नाही. चारही बाजूंनी शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. केवळ शहरी लोकांना खुश ठेवण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी देण्याचा अधिकार शासनाला कोणी दिला? शेतकऱ्यांनी कां म्हणून नुकसान सहन करावयाचे ? शासन जर महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी धोरण आखते तर त्यांनी शेतकऱ्यांची ही नुकसानाची जबाबदारी घेतली पाहिजे, त्यासाठी शासनाने एकरी २० हजार रुपये अनुदान म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करावे. अशी आग्रही मागणी भारत कृषक समाज महाराष्ट्राचे चेअरमन डॉ. प्रकाश मानकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाय शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

RELATED ARTICLES

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक जाहीर ! 10 जुनला मतदान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : येत्या ७ जुलै २०२४ रोजी विधान परिषदेच्या चार सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असून या जागा रिक्त होणार...

मोदींना आता ‘त्या’ घोटाळेबाजांचा प्रचार करावा लागणार? किरीट सोमय्या तोंडघशी पडले !

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मुंबईतील सहा मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांची घोषणा झाली आहे. त्यामुळे आता मुंबईतील प्रचाराला वेग...

वाचा संपूर्ण यादी ! ठाकरेंच्या शिवसेनेचे २१ उमेदवार जाहीर

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. शिवसेना,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

Recent Comments

error: Content is protected !!