Sunday, May 5, 2024
Home संपादकिय पहिल्यांदा मोदी 'बॅकफुट' वर ! प्रचारातील 'नॅरेटिव्ह' मोदींनाच प्रतिकुल जाऊ लागले ?...

पहिल्यांदा मोदी ‘बॅकफुट’ वर ! प्रचारातील ‘नॅरेटिव्ह’ मोदींनाच प्रतिकुल जाऊ लागले ? जाहीरातीत बाळासाहेब ठाकरे

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : सलग दोन लोकसभा निवडणुकीत भाजपला ‘विश्वसनीय’ विजय मिळवून देणारे नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार 400 पार’ चा नारा देत तिसऱ्या लोकसभा निवडणूकीचा प्रारंभ तर केला. परंतु 2024 च्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदानासाठीच्या प्रचार फेरीच्या पुर्वीच नरेंद्र मोदी ‘बॅकफुट’ वर आले. पहिल्याच फेरीत ‘अब की बार 400 पार’ बाजूला ठेवून प्रचार करताना दमछाक झाली. दोन टप्प्यातील प्रचारातील ‘नॅरेटिव्ह’ मोदींनाच प्रतिकुल जाऊ लागल्यानेच, आज महाराष्ट्रातील वर्तमान पत्रात छापून आलेल्या जाहीरातीत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरला आहे.आणि हे न समजण्या एवढे मतदार दुधाखुळे निश्चितच नाहीत.

20140श नंतर पहिल्यांदा निवडणूक ‘नॅरेटिव्ह’ त्यांच्या प्रतिकुल गेल्याचे दिसू लागले. येत्या २६ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात मतदान असून आज जाहीरातीत मोदींच्या फोटोच्या वरच शिवसेनेचे संस्थापक, हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो, बरेच काही सांगून जाते. का आणि कशा साठी हा फोटो वापरला ? या मुद्द्यावर भाजप व समर्थक ठेवणीतले उत्तर देणारचं पण मोदींचा करिश्मा ओसरत आहे. जर नाही तर, अटलजींचा फोटो वर्जित करणारी व्यक्तीने ,आपल्या डोक्यावर ठाकरेंचा फोटो लावण्याचं काम नाही.हा येथे मुद्दा नाही.असो !

मागील १० वर्षात मोदींनी कधीच या गोष्टीची कधीही दखल घेतली नाही की, विरोधी पक्षनेते त्यांच्या बद्दल काय बोलत आहेत. मोदी नेहमी आपला अजेंडा बनवून, विरोधकांना त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी ‘मजबूर’ करत. पण यावेळी विरोधकांच्या ‘संविधान बदलणार’ या मुद्द्यावर मागील आठवड्याभरात अनेकदा मोदी आणि शाह यांना प्रत्येक सभेत स्पष्टीकरण द्यावे लागले. एवढेच नव्हे तर गृहमंत्री अमित शाह यांनी एका टिव्ही आणि वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा मुद्दा खोडून काढला. राहुल गांधी जनतेची दिशाभूल करत, तथ्यहीन आरोप करीत आहे. याविरोधात निवडणूक आयोगाकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. असंही भाजप नेते सांगत आहेत. मात्र अप्रत्यक्षपणे संविधान बदलणार या मुद्द्यावर बचावात्मक पवित्रा घेण्यास मोदी-शाह मजबुर आहेत.

आता सात टप्प्यातील प्रचाराचे दोन टप्पे आज संपले आहे. मात्र कमी झालेल्या मतदानातील विविध कारणांसह मतदारांचा ‘निरुत्साह’ ने भाजपसाठी कळीचा प्रश्न निर्माण केलेला असताना, जसा जसा प्रचार चुरसीचा होत जाईल, तसं तसा ‘संविधान बदलणार’ प्रचारात शिगेला पोहोचेला असेल. भाजपकडून यंदा’400 पार’ केवळ देशाची ‘घटनाबदल’ साठीच, हे मतदारांच्या मनात खोलवर रुजविण्यात इंडिया आघाडी आणि इतर विरोधी पक्ष सध्या तरी यशस्वी झाले आहेत. या मुद्द्यावर देशातील साहित्यिक, लेखक, प्रबोधनकार, चवळीतील कार्यकर्ते, पत्रकार, अर्थतज्ज्ञ, विविध समाजातील विविध संस्था, संघटना, पुरोगामी विचारसरणीचे साहित्यिक आंबेडकरी विचारवंत, दलित चळवळीला चालना देणारे समाजधुरणी यांच्यासोबत लोकशाहीचे पुरस्कर्ते एकजुट झाले आहेत. ही एकजुट हळूहळू आंदोलनात्मक स्वरूपात पुढे येईल, असे आश्वासक चित्र दिसत आहे.

प्रचाराच्या तिसऱ्या फेरीत मोदी कोणता ‘नॅरेटिव्ह’ तयार करणार, हे दिसून येईलच.पण इंडिया आघाडीसह इतर विरोधी पक्षांकडून संविधान बदलणार आणि आर्थिक विषमता, हे दोन मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी ठेवूनच पुढे जाणार असल्याचे स्पष्ट दिसते. यात दुमत नाही की, उत्तर भारतात या मुद्द्यावर आंबेडकरी जनता, दलित व आदिवासी मतदारांमध्ये विचार प्रवाह निर्माण होत आहे. मोदी आणि भाजप नेतृत्वाने कितीही सांगितले तरी मतदार या मुद्द्यावर आश्वस्त होईल, यात शंका आहे. विविध माध्यमांतून येत असलेल्या माहितीने हा मुद्दा भाजपची चिंता वाढविणारा आहे. या अनुषंगाने इंडिया आघाडीच्या मतांचा टक्का वाढणार तर भाजप एनडीएचा मतांचा टक्का घसरणार, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.

दोन टप्प्यात शहजादा, मुसलमान, कॉंग्रेस या भोवताली मोदींनी बॅटिंग लाईनअप ठेवली.तर अमित शाह यांनी राम मंदिर. ३७० कलम, तीन तलाक आणि कॉंग्रेस या मुद्द्यावर भर देत असले तरी, येत्या काळात विरोधकांच्या पिचवर मोदींना बॅटिंग करावी लागली तर ? तर मोदी की गारंटी तसेच 2047 पर्यंत विकसीत भारत आणि मोदी को वोट देने के लिये,,,,,,,! सारखे आश्वासन, वाढत्या तापमानात विरघळून जाईल. विविध सर्व्हेत मोदी भारी अंतराने विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आले. पण दुसऱ्या टप्प्यात पुन्हा भाजपचे बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघात जर मतांचा टक्का घसरला तर, तर अवघड जागेवरच दुःखणं होईल.

एकमात्र खरं की, 2024 ची निवडणूक जाहीर होताच, निकाल लागलेलाच आहे, असं सर्वत्र चित्र पसरलं होतं. आजही हेच चित्र रंगविले जात असताना, दरवर्षी २ कोटी रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, काळेधन, बहुत हुई महागाई की मार,असे एक ना अनेक मुद्द्यांवर मोदींनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याने, “संविधान बदलणार” वर मोदींनी कितीही सांगितले तरी, त्यावर विश्वास ठेवायचा कसा, असा प्रश्न उभा राहतो आणि यावर मोदी बॅकफूटवर आहेतः तृतास एवढेच

RELATED ARTICLES

डिजिटल भारतात टक्केवारीसाठी 11 दिवस विलंब का ? निवडणूक आयोग मात्र मतदारांच्या संभ्रमास्थेवर गप्प !

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : लोकसभेच्या महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मिळून १३ मतदारसंघामध्ये मतदान झाल्यानंतर त्यावेळी दिवशी सायंकाळी...

खरेतर काँग्रेसने मोदींचं आभार मानायला हवेत ! आता ‘मोदी की गॅरंटी’ चिरनिद्रा घेत आहे

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : मागील 10 वर्षांपासून सतत 'इलेक्शन मोड' वर राहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचारासाठी विशेष मुद्द्यांची...

फक्त 51.83 टक्केच महिलांनी बजावला अकोला पश्चिममध्ये मतदानाचा हक्क ! बाळापूरात सर्वात जास्त

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काल 26 एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदानात 58.50 टक्के महिलांनी मतदानाचा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

अकोल्यातील आरोपी डॉक्टरासोबत सिव्हील लाईन पोलिसांचं साटेलोटे ? गुन्हा दाखल करण्यास 4 दिवस का ?

अकोला दिव्य न्युज ब्युरो : चेहऱ्यावरील आजारांसाठी आलेल्या महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग केल्याप्रकरणाची तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेला सिव्हिल लाइन्स पोलिस...

अँड उज्ज्वल निकमांनी करकरेंना लागलेल्या गोळीचे सत्य न्यायालयापासून लपवलं ! वडेट्टीवार यांच विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती आणि आताचे भाजपाचे उत्तर मध्य मुंबईतील...

राष्ट्रीय पातळीवर श्री समर्थ कोचिंग क्लासेसचा नावलौकिक !जेईई मेन परिक्षेत विद्यार्थ्यांचे सुयश

अकोला दिव्य न्युज ब्युरो : पश्चिम विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या मुलभूतरित्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर व ख्यातनाम अकोल्यातील श्री समर्थ कोचिंग क्लासेसच्या...

अकोल्यातील अल्पवयीन मुलीची धर्मांतरानंतर एक लाखांत राजस्थानात विक्री; आईसह टोळी जेरबंद

Akola crime:अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला येथील एका अल्पवयीन मुलीची धर्मांतर करून तिचा राजस्थानातील तरुणाशी यवतमाळात विवाह लावून देत एक लाख...

Recent Comments